-
तुमचे काम आगीत टिकून राहील का?टेहळणी बुरूज—१९९८ | नोव्हेंबर १
-
-
९. पौल प्रामुख्याने पाया घालणारा होता तरी, त्याने शिकवलेले सत्य स्वीकारणाऱ्यांबद्दल त्याला काय वाटत होते?
९ पौलाने लिहिले: “ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो; तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल; तो दिवस ते उघडकीस आणील; कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल.” (१ करिंथकर ३:१२, १३) पौलाचे तात्पर्य काय होते? पार्श्वभूमीचा विचार करा. पौल स्वतः पाया घालणारा होता. आपल्या मिशनरी दौऱ्यादरम्यान त्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करून ख्रिस्ताविषयी कधीच न ऐकलेल्या पुष्कळ लोकांना प्रचार केला. (रोमकर १५:२०) त्याने शिकवलेल्या सत्याचा लोक जसजसा स्वीकार करीत गेले तसतशा मंडळ्या तयार होत गेल्या. या विश्वासू लोकांची पौलाला खूप काळजी होती. (२ करिंथकर ११:२८, २९) परंतु, त्याच्या कामामुळे त्याला सारखे फिरतीवर राहावे लागत असे. म्हणून करिंथमध्ये पाया घालण्यासाठी १८ महिने राहिल्यानंतर तो इतर शहरांत प्रचार करावयास गेला. तरीसुद्धा, त्याने तेथे सुरु केलेले काम इतरांनी पुढे कसे नेले हे जाणून घेण्यास तो उत्सुक होता.—प्रेषितांची कृत्ये १८:८-११; १ करिंथकर ३:६.
-
-
तुमचे काम आगीत टिकून राहील का?टेहळणी बुरूज—१९९८ | नोव्हेंबर १
-
-
११ अशा इमारतींना आग लागलीच तर काय झाले असते? पौलाच्या दिवसात उत्तर स्पष्टच होते आणि आज आपल्याही दिवसात उत्तर स्पष्टच आहे. खरे तर, सा.यु.पू. १४६ मध्ये रोमी जनरल ममीयस याने करिंथ शहरावर कब्जा करून त्याला आग लावली. लाकूड, गवत किंवा खुंटाच्या बनवलेल्या इमारतींची राखरांगोळीच झाली. दगड आणि सोन्यारुप्याने सजवलेल्या कणखर इमारतींचे काय? त्या नक्कीच टिकल्या. करिंथमधील पौलाचे विद्यार्थी दररोज अशा इमारतींजवळून ये-जा करीत असावेत—या टिकलेल्या दगडी इमारतींपुढे कच्च्या इमारती केव्हाच जमीनदोस्त झाल्या होत्या. आपल्या श्रोत्यांसमोर किती छान चित्र उभे करून पौलाने आपला मुद्दा स्पष्ट केला! शिकवताना आपण स्वतःला बांधकाम करणारे समजले पाहिजे. आपण सर्वोत्तम, सर्वात टिकाऊ साहित्यांचा उपयोग केला पाहिजे. तेव्हा आपले काम जास्त टिकाऊ बनू शकते. ते टिकाऊ साहित्य काय आहे व त्यांचा उपयोग करणे इतके महत्त्वाचे का आहे?
-
-
तुमचे काम आगीत टिकून राहील का?टेहळणी बुरूज—१९९८ | नोव्हेंबर १
-
-
१२. करिंथमधील काही ख्रिश्चनांचे बांधकाम ओबडधोबड कसे होते?
१२ स्पष्टतः, पौलाला वाटले की करिंथमधील काही ख्रिश्चनांचे काम कच्चे होते. त्यांचे काय चुकत होते? संदर्भानुसार, मंडळीत फुटी पडत होत्या; मंडळीच्या ऐक्याला तडा जाण्याचा धोका होता तरीदेखील लोकांचेच जास्त कौतुक होत होते. काही म्हणत होते, “मी पौलाचा,” तर काही “मी अपुल्लोसाचा,” असे म्हणत होते. काहींना आपल्या बुद्धीचा जास्त गर्व वाटत होता. म्हणूनच याचा परिणाम असा झाला, की तेथील वातावरणाला दैहिक विचारसरणीचा, आध्यात्मिक अप्रौढतेचा आणि “हेवा व कलह” यांचा दर्प येऊ लागला. (१ करिंथकर १:१२; ३:१-४, १८) ही त्यांची मनोवृत्ती मंडळीत व सेवेत जे शिकवले जात होते त्यातून प्रकट होऊ लागली. परिणामतः, हलक्या साहित्यांनी इमारत बांधल्याप्रमाणे शिष्य बनवण्याचे त्यांचे कार्य ओबडधोबड होते. हे त्यांचे काम ‘अग्नीत’ टिकणार नव्हते. पौल कोणत्या अग्नीविषयी बोलत होता?
१३. पौलाच्या दाखल्यातील अग्नी कशाला चित्रित करते, व सर्व ख्रिश्चनांनी कशाविषयी जागृत असावयास हवे?
१३ आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक अग्नीपरीक्षा असते; आपल्या विश्वासाची परीक्षा. (योहान १५:२०; याकोब १:२, ३) आपल्याला जशी एक गोष्ट माहीत असावयास हवी तशीच करिंथमधील ख्रिश्चनांना देखील एक गोष्ट माहीत असावयास हवी होती, की आपण ज्यांना सत्य शिकवू त्या सर्वांची परीक्षा होईलच. आपण व्यवस्थितरीत्या शिकवले नाही तर त्याचे दुःखद परिणाम घडू शकतात. पौलाने इशारा दिला: “ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल, त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल; परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल.”c—१ करिंथकर ३:१४, १५.
-