-
देवाचं राज्य सुरू झालंय!कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
२. जगाच्या परिस्थितीत आणि लोकांच्या वागण्या-बोलण्यात १९१४ पासून कोणता फरक दिसून आला आहे?
येशूच्या शिष्यांनी त्याला विचारलं, “तुझ्या उपस्थितीचं आणि जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीचं चिन्ह काय असेल?” (मत्तय २४:३) या प्रश्नाचं उत्तर देताना येशूने अशा बऱ्याच घटनांबद्दल सांगितलं, ज्या भविष्यात घडणार होत्या. स्वर्गात त्याचं राज्य सुरू झाल्यावर या घटना घडतील असं त्याने सांगितलं. या घटनांपैकी काही घटना म्हणजे युद्ध, दुष्काळ आणि भूकंप. (मत्तय २४:७ वाचा.) बायबलमध्ये असंही सांगितलं होतं की “शेवटच्या दिवसांत” लोकांच्या वागणुकीमुळे जगणं खूप “कठीण” होईल. (२ तीमथ्य ३:१-५) या भविष्यवाण्यांमधले शब्द खासकरून १९१४ पासून पूर्ण होताना स्पष्टपणे दिसत आहेत.
३. देवाचं राज्य सुरू झाल्यापासून परिस्थिती इतकी का बिघडली आहे?
येशू स्वर्गात देवाच्या राज्याचा राजा बनल्यानंतर लगेचच सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांसोबत लढला. या लढाईत सैतान हरला. बायबलमध्ये म्हटलंय, की त्याला “पृथ्वीवर फेकून देण्यात आलं, आणि त्याच्यासोबत त्याच्या दूतांनाही फेकण्यात आलं.” (प्रकटीकरण १२:९, १०, १२) सैतान आज खूप संतापलेला आहे. कारण त्याला माहीत आहे की लवकरच त्याचा नाश होणार आहे. म्हणूनच तो पृथ्वीवर वेगवेगळी संकटं आणून लोकांना त्रास देतोय. आणि त्यामुळेच आज जगाची परिस्थिती इतकी बिघडली आहे. पण देवाचं राज्य या सगळ्या समस्या काढून टाकेल आणि त्यानंतर पृथ्वीवर खूप चांगली परिस्थिती असेल.
-
-
देवाचं राज्य सुरू झालंय!कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
५. जगाचं चित्र १९१४ पासून बदललं आहे
येशूने आधीच सांगितलं होतं, की तो राजा बनल्यानंतर या जगाची परिस्थिती कशी असेल. लूक २१:९-११ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
तुम्ही यांपैकी कोणत्या गोष्टी पाहिल्या किंवा ऐकल्या आहेत?
मानवी राज्याच्या शेवटच्या दिवसांत लोकांचं वागणंबोलणं कसं असेल याबद्दल प्रेषित पौलने सांगितलं होतं. २ तीमथ्य ३:१-५ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
तुम्ही लोकांच्या वागण्या-बोलण्यात यांपैकी कोणत्या गोष्टी पाहिल्या आहेत?
-